Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ

श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई ः शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावल्याने मालेगाव पोलिस ठाण्या

नियमांच्या चौकटीतच बोलण्याचा अधिकार : लोकसभाध्यक्ष बिर्ला
महाघोटाळा? किनवटमध्ये दस्त नोंदणीचा काळाबाजार; ‘बाहेरील’ मालमत्तांसाठी वसुलीचे दुकान तेजीत!डव्हान्स बुकिंग ते शेजारील तालुक्यांत ‘सेटिंग’; दलालांचे जाळे नांदेडपर्यंत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

मुंबई ः शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावल्याने मालेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. तोच आता ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांना देखील घेरण्याचे काम महायुतीच्या नेत्यांकडून होत आहे. मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमन परदेशी यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सुषमा अंधारे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा परदेशी यांचा दावा आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भादंवि 295-अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर सुषमा अंधारे यानांही पोलिस पाचारण करणार आहेत, अशी माहिती तपास अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

COMMENTS