Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळात आज अवकाळी पावसावर विरोधक घेरणार

नागपूर ः विधिमंडळाचे अधिवेशनाचे पहिले दोन दिवस राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांवरून गाजले असतांना, आता सोमवारी अध

Nashik : मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला | LOKNews24
मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत राजेंद्रसिंह गुडांचं शिवसेनेत प्रवेश
काळामवाडी येथे तीन घरे आगीत जळून खाक; अंदाजे 15 लाखाचे नुकसान

नागपूर ः विधिमंडळाचे अधिवेशनाचे पहिले दोन दिवस राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांवरून गाजले असतांना, आता सोमवारी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल  हे या चर्चेचा निर्णय देतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण  दिसून येत आहे. त्यामुळे विरोधक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरून सत्ताधार्‍यांना घेरण्याची चिन्हे आहेत. प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर अवकाळीच्या मुद्द्यावर ही अल्पकालीन चर्चा होईल. या चर्चेमध्ये शेतकर्‍यांच्या हिताचा कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील शेतकर्‍यांवर यंदाच्या वर्षात एकामागून एक संकट येतच गेली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले त्यानंतर दुष्काळ, पुन्हा  आलेला अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच पार्श्‍वभूमीवर 75 टक्क्यांपेक्षा अधिक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरीही अनेक भागात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान या मुद्द्यावर विरोधक सत्ताधार्‍यांना घेरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 1 हजार  महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही अनेक तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही, असे देखील विरोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान अशा अनेक मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात दिलासा देणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता. त्यातच अवकाळी पावसाने  लावल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत देखील भर पडली. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावासने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापूस, भात यांसारख्या अनेक पिकांना फटका बसला आहे.

COMMENTS