Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरच्या जिरीबामचे शेकडो लोक छावण्यांमध्ये

इम्फाळ ः मणिपूर राज्यातील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, या भडकलेल्या हिंसाचाराला सुरक्षा दलाने आटोक्यात ठेवले. परंतु परिसरात अजूनही दहशत

युवकावर हल्ला करणार्‍या दोन आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा 10 हजार रूपये दंडाची शिक्षा
वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून तरास नैसर्गिक अधिवासात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार : अजित पवार

इम्फाळ ः मणिपूर राज्यातील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, या भडकलेल्या हिंसाचाराला सुरक्षा दलाने आटोक्यात ठेवले. परंतु परिसरात अजूनही दहशत दिसते. जिरीबामच्या अनेक संवेदनशील भागांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या तीन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शेकडो लोक तात्पुरत्या छावण्यांत राहत आहेत. तीन दिवसांत कुकी तसेच मैतेई समुदायाची किमान 150 घरे पेटवून देण्यात आली. त्यामुळे सुमारे 2 हजार लोक विस्थापित झाले. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचारानंतरही जिरीबाम जिल्ह्यात शांतता होती. परंतु एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोशल मीडियात त्याला जातीय हिंसाचार असल्याचे संबोधण्यात आले.

COMMENTS