Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीजयंत्रणेपासून सुरक्षिततेचे व सतर्कतेचे महावितरणचे आवाहन

नाशिक : जीवनामध्ये विजेचे महत्व व फायदे अत्यावश्यक आहेचं, मात्र सावधानता बाळगली नाहीतर नुकसानही होऊ शकते. सध्या पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला संसदेचा अवमान
पाटण तालुक्याचा सुपूत्र कमांडो सुरज शेवाळे याने फडकविला 22 हजार फुटांवर तिरंगा
शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : जीवनामध्ये विजेचे महत्व व फायदे अत्यावश्यक आहेचं, मात्र सावधानता बाळगली नाहीतर नुकसानही होऊ शकते. सध्या पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक वघरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत, विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाकडून करण्यात आले आहे.

दैनंदिन वीज वापराच्या महत्वाच्या बाबी : विजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणा-या विजतारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी. पावसापासून बचाव करतांना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा, कारण अनावधाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दुरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना विजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करतांना मेन स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका, विद्यूत वाहीनीच्याखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका, विद्युत खांब किंवा तणाव – ताराला गुरे ढोरे बांधू नका. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका,तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका, विजेच्या अनधिकृत वापर टाळा, विशेषता विद्युत मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

दर्जेदार उपकरणांचा वापर :  घर, उद्योग, कार्यालय, अथवा शेती असो वीज वापरतांना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा घेतांना  किंवा वेळोवेळी विद्युत केबल स्विचेस अथवा इतर उपकरणे ही आय.एस.आय. प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित कंत्राटदाराकडूनच विद्युतीकरणाची कामे करून घ्यावीत. 

योग्य अर्थिंग :- वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्वाचा घटक  आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकारची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व वायरिंग इनस्टोलेशन कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉंड कार्यक्षमपणे लावून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

इन्सुलेटेड वायरचा उपयोग:– अर्थ लिकेजच्यापासून होणारा धोका टाळण्यासाठी ई.एल.सी.बी.(अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर)वापरावे. मोठमोठया अपार्टमेंटमध्ये २० ते ५० मिटरची स्वतंत्र रूम असते. मात्र ब-याचवेळा त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते मिटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मिटररूममध्ये पाणी जाणार नाही त्याच बरोबर भिंती ओल्या होणार नाही याची काळजी घ्यावी. 

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पील्लर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे,शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, दरम्यान, पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे,.असे आवाहन महावितरणने केले आहे. 

COMMENTS