Homeताज्या बातम्या

 छत्रपती संभाजी नगरच्या उद्योजकांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

शहराची शांतता भंग होऊ नये यासाठी आवाहन

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर नामांतरणावरून सध्या शहरांमध्ये शांतता भंग होण्याची चिन्ह उद्योजकांना दिसले आहे त्यामुळे उद

आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर नामांतरणावरून सध्या शहरांमध्ये शांतता भंग होण्याची चिन्ह उद्योजकांना दिसले आहे त्यामुळे उद्योजकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या शहराची शांतता भंग होऊ नये. नामांतराच्या बाजूने आहोत की विरोधात आहोत हा मु्द्दा नाही. आम्ही शहराच्या बाजूने आहोत. नाव कोणतेही असो या ठिकाणी जी ट्वेंटी निमित्त परिषद झाली आहे. त्यातून एक संदेश जगामध्ये चांगला गेला आहे. तो पुसला जाऊ नये, कोरोनानंतर उद्योग नगरी आता कुठे रुळावर येत असताना मध्येच जर अशा काही गोष्टी घडल्या तर यातून शहराची प्रतिमा मलिन होऊ शकते. याकरिता शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे उद्योजकांनी सांगितले.

COMMENTS