Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा ः औताडे

कोपरगाव शहर ः महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून सात खासदार निवडून आले आहेत.शिवसैनिकांना बळ देत असतानाच महा

भारतीय बौद्ध महासभेची कोपरगाव कार्यकारिणी जाहीर
इन्स्पायर अबँकस स्पर्धेत जान्हवी टेकाळे प्रथम
नगरच्या कलाकारांचा लक्ष्मीपूजनप्रसंगी सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम

कोपरगाव शहर ः महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून सात खासदार निवडून आले आहेत.शिवसैनिकांना बळ देत असतानाच महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहेत. शिवसेना पक्ष बळकटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षाचा 58 वा वर्धापन दिन निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव नगरपालिका शाळा क्र 9 येथे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी औताडे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी  शिवसेना पक्षाची स्थापना करून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याप्रमाणे महाराष्ट्रात काम केले आज हाच वारसा पुढे समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असल्याचेही नितीनराव औताडे यांनी सांगत सर्वाना शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी जाधव, मनिल नरोडे, रावसाहेब थोरात, अभिषेक आव्हाड, अक्षय जाधव, मनोज राठोड, सनी गायकवाड, मीनाक्षी वाकचौरे, भारत कुर्‍हाडे, हेमा तवरेज, मधुकर टेके, राजेंद्र वाळुंज, घनश्याम वारकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

COMMENTS