Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उजनीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्तारोको

पंढरपूर : उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे; या मागणीसाठी सोमवारी सकाळी पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे श

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या डॉक्टर आरोपीला फाशीची शिक्षा द्या ; विहिंप दुर्गावाहिनीची मागणी
अहिल्यानगर शहरातून पे अँड पार्कचे बोर्ड जातात चोरीला
नंदुरबारमध्ये पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

पंढरपूर : उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे; या मागणीसाठी सोमवारी सकाळी पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पंढरपूर जिल्ह्यात हवा तसा पाऊस यंदा झाला नाही. यामुळे सध्या पंढरपूर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिके जळू लागली आहेत. पिकांना पाणी आवश्यक असून याकरिता उजनी धरणातून कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

COMMENTS