Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेकठिकांणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, तर अनेकांचे मृत्य

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
विदर्भाचा अनुशेष भरून काढू – मुख्यमंत्री शिंदे
महसुली नोंदी असणार्‍यांना कुणबी दाखले

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेकठिकांणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, तर अनेकांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसानीसाठी प्रती कुटुंब 10 हजार रुपये वाढीव मदतीची घोषणा केली. तसेच दुकानदार, टपरी धारकांनाही 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्याचे त्यांनी नमूद केले. ते शुक्रवारी पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत बोलत होते. ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येणार आहे.
सध्या घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब 2500 रुपये आणि घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब 2500 रुपये असे 5 हजार रुपये देण्यात येतात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांड्यांच्या नुकसानीसाठी आता 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.  ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल. विधानसभेत केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी वाढीव मदतीबाबत माहिती दिली.
घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपड्यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये आणि घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये असे 5 हजार रुपये सध्या देण्यात येतात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडीकुंडी यांच्या नुकसानीसाठी आता 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानात दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना कुठलाही दिलासा मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन आम्ही त्यांनाही आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानाच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

टपरीधारकांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत – मुख्यमंत्र्यांनी केवळ दुकानदारच नाही तर टपरीधारकांसाठीसुद्धा मदत जाहीर केली. ते म्हणाले की, छोट्या छोट्या टपर्‍यांमधून व्यवसाय करणारे आणि कुटुंब चालवणारे अनेक जण आहेत. अशा नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. आता अशा टपरीधारकांनासुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये पर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना ही मदत देण्यात येईल.

महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य – उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणार्‍या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून 30 हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या वाढीमुळे अतिरिक्त रु 913 कोटी एवढ्या निधीची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.

COMMENTS