Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याने कोपरगावात जल्लोष

कोपरगाव शहर ः भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार  स्थापन होऊन तिसर्‍यांदा नरेंद्रजी मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच कोपरगाव शह

देशासाठी धर्मासाठी आणि कर्मासाठी जगा – सोपान महाराज
सत्कर्मातील समर्पणशीलताच चिरंजीव ठरते : प्रा. विलासराव तुळे
जनतेमधून सरपंच निवड होण्यासाठी पुन्हा कायदा अमलात आनण्याची सरपंच परिषदेची मागणी

कोपरगाव शहर ः भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार  स्थापन होऊन तिसर्‍यांदा नरेंद्रजी मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील सावरकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज स्मारक-डॉ.आंबेडकर स्मारक ते  हेडगेवार चौक  पर्यंत ढोल-ताशा च्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीद्वारे मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, ऍड.जयंत जोशी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड, प्रभाकर वाणी, चेतन खुबाणी, विनीत वाडेकर, योगेश वाणी, वसंत जाधव सुरेश कांगुणे, मनोहर कृष्णाणी, विजय जोशी, नंदकुमार जोशी, प्रकाश सवई, अनिल वायखिंडे, किरण थोरात, गणेश वाणी, सादिक शेख, राजेंद्र खैरे, संजय कानडे, घोडके, किरण पारीख, सतीश चव्हाण, संदीप गउल, निलेश साळुंके आदी कार्यकर्ते जल्लोषात  सहभागी झाले होते

COMMENTS