Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला

मुंबई ः मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरले आहे. तसेच अन्य 4 धरणे 95 टक्क्यांहून जास्त

आपली पेन्शन आपल्या दारी मोहिमेला प्रथम पुरस्कार
पथदिवे सुरू करण्यासाठी नागरिकानेच घेतला पुढाकार ; जागरूक करणार मनपासाठी भिख मांगो आंदोलन
भय इथले संपत नाही… एकाच दिवसात सापडले बाराशेवर रुग्ण, लॉकडाऊनची चिन्हे वाढली

मुंबई ः मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरले आहे. तसेच अन्य 4 धरणे 95 टक्क्यांहून जास्त भरली आहेत. जुलैमहिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. धो धो बरसलेल्या पावसाने मुंबईतील धरणांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली. अप्पर वैतरणा धरण 71.92 टक्क्यांनी भरले आहे. मोडकसागर 94.20 टक्के, तानसा 98.12 टक्के, मध्य वैतरणा 96.26 टक्के, भातसा 78.47 टक्के, विहार 100 टक्के, तुळशी 98.12 टक्क्यांनी भरले आहे.

COMMENTS