Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांब्यात शासन आपल्यादारी उपक्रम उत्साहात

पुणतांबा/प्रतिनिधी ः येथील  महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता यांच्यामार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या म

समता तिरंगा रॅली हा उपक्रम अमृत महोत्सवानिमित कोपरगावात संपन्न झालेल्या उपक्रमांपैकी एक उपक्रम.
महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंती उत्साहात
केंद्र व राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कृत करण्याचा वर्ल्ड पार्लमेंटचा मानस

पुणतांबा/प्रतिनिधी ः येथील  महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता यांच्यामार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपले दारी मोहीम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर धनंजय धनवटे हे होते. यावेळी कृषी सहाय्यक राजेश प-हे यांनी शेतकर्‍यांना कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणार्‍या मागेल त्याला शेततळे ,ठिबक व तुषार सिंचन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री खाद्य उन्नयनयोजना व इतर लाभांच्या योजनांची सविस्तरपणे माहिती दिली. कृषी सहाय्यक किरण धुमाळ यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया व सोयाबीन वाणांची माहिती व एकात्मिक खत व्यवस्थापन सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग नियंत्रण याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

COMMENTS