Homeताज्या बातम्या

कांद्यासह भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत

शासनाने मदत करण्याची मागणी

धाराशिव प्रतिनिधी - सोयाबीनचा केवळ काढणी भाव तीन ते ४ हजार एक्कार आणि उत्पन्न ४ क्विंटल , हरभराही तीच गत म्हणुन पाणी असलेले बागायत शेतकरी

आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा- भाई मोहन गुंड
‘ज्ञानेश्वर’ सर्वाधिक भाव देण्यात नेहमीच अग्रेसर; माजीआ.घुले पाटील ; ज्ञानेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

धाराशिव प्रतिनिधी – सोयाबीनचा केवळ काढणी भाव तीन ते ४ हजार एक्कार आणि उत्पन्न ४ क्विंटल , हरभराही तीच गत म्हणुन पाणी असलेले बागायत शेतकरी कांदा , कोथींबीर , वांगी , टमाटे यासह भाजीपाल्याकडे वळाले मात्र सध्या भाजीपाल्याचेही भाव गडगडले असुन कांदातर रडवतच आहे . वाणेवाडीच्या शेतकऱ्याने १ एक्कर पंचगंगा कंपनीचा कांदा लावला , कंपनीच्या बियाण्यात धोका झालाच पण त्याला खर्च सोडा काढलेल्या व बाजारात पाठवलेल्या कांद्याचे पदरून १३०० रूपये द्यावे लागले . कंपनीच्या सदोष बियाण्यामुळे त्याने आपल्या शेतातच असा कांद्या जाळूण टाकला व चांगला बाजारात पाठवला पण काढणीचा खर्चही निघाला नाही   त्यामुळे सर्वसामांन्यांचे व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असे म्हणणाऱ्या सरकारणे याकडे लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी होत आहे . तर भाजीपाल्याचे भाव एकदम पडीक असुन शेतकऱ्याला पदरून खर्च करावा लागत असल्याचे व्यापारी कलीम बागवान यांनी सांगीतले .

COMMENTS