मुंबई प्रतिनिधी / विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit pawer) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे सध
मुंबई प्रतिनिधी / विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit pawer) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे, महाराष्ट्रात बारामती येतेच असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्याचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, त्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो. असा खोचक टोला अजित दादांनी लगावला आहे .

COMMENTS