नवी दिल्ली : दिवाळीनंतर दिल्ली शहर परिसरात कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास

नवी दिल्ली : दिवाळीनंतर दिल्ली शहर परिसरात कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या दिल्लीकरांना भेडसावत आहेत. लहान मुलांचे तर आरोग्यच धोक्यात आले असून तिघामागे एका बालकाला अस्थमा व गंभीर श्वसनविकार घेऊनच पुढचे आयुष्य काढावे लागणार आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.
भारतातील सर्वांत 10 प्रदूषित शहरांत उत्तर प्रदेशातील 5 शहरांचा समावेश आहे. जगातील सर्वांत घातक 10 प्रदूषित शहरांत दिल्ली ‘टॉप’’ला असण्याचे गेल्या काही वर्षांपासून आहे. राज्य व केंद्र सरकारच्या टोलवाटोलवीत दिल्लीकरांचा जीव पणाला लागल्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाशी संबंधित ‘आयक्यू-एयर’ या गटाने जी नवी यादी जारी केली त्यात दिल्लीनंतर मुंबई, कोलकत्ता या शहरांचाही त्यात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS