Homeताज्या बातम्या

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ’धर्मर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत’ यांच्या प्रतिमेला लिंबागणेशमध्ये ’जोडे मारो’ आंदोलन

लिंबागणेश: दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तसेच आंदोलनकर्त्यांबाबत स

बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण
उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’
ज्या शाळेने घडविले, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार; १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप

लिंबागणेश: दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तसेच आंदोलनकर्त्यांबाबत सदाभाऊ खोत यांनी ’दहशतवादी’ संबोधून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “दिल्ली पोलिस मुर्दाबाद”, “विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा” अशा विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर बीडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मागण्यांचे अधिकृत निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनात सेवा सोसायटीचे चेअरमन रविबापू निर्मळ, अ‍ॅड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, शिवशक्ती भीमशक्ती विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, संतोष भोसले, सर्पमित्र अशोक जाधव, ज्ञानेश्वर कुदळे, सुंदर येडे, सोमीनाथ आमटे, सिताराम थोरात, रामहरी चाळक, गुलाब कांबळे, नाना निर्मळ, अमोल निर्मळ, अशोक गोंडे, रामचंद्र मुळे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांवरील लाठीमार लोकशाहीला काळिमा – डॉ. गणेश ढवळे

लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना व विद्यार्थ्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. जंतरमंतर येथे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार हा लोकशाही मूल्यांवर आघात असून, या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.

आंदोलनातील प्रमुख मागण्या:

  • नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
  • जंतरमंतर येथील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी.
  • दोषी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी.
  • आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून संबंधितांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी.

COMMENTS