Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूंची टंचाई; पश्‍चिम आशियातील संघर्षाचा क्रिकेटवर फटका

लंडन : पश्‍चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाचे पडसाद आता केवळ राजकारण आणि अर्थकारणापुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही उमटू लागले आहेत. विशेष

दक्षिण कोरियाचा पराभव करून भारत उपांत्य फेरीत पोहोचला
मेस्सीला रोनाल्डो पेक्षाही दुप्पट रकमेची ऑफर
उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?

लंडन : पश्‍चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाचे पडसाद आता केवळ राजकारण आणि अर्थकारणापुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही उमटू लागले आहेत. विशेषतः क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून येत असून इंग्लंडमधील आगामी क्रिकेट हंगामापूर्वी ड्यूक चेंडूंची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.
इंग्लंडमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून नव्या क्रिकेट हंगामाची सुरुवात होत असते. या पार्श्‍वभूमीवर चेंडूंचा पुरेसा साठा असणे अत्यावश्यक मानले जाते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. उपलब्ध साठा नेहमीपेक्षा जवळपास निम्म्यावर आल्याने आयोजक आणि संघ व्यवस्थापनांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. काउंटी पातळीवरील स्पर्धा आणि देशांतर्गत कसोटी सामने या दोन्हींसाठी ड्यूक चेंडू अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. सर्व प्रथम श्रेणी संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने या टंचाईचा परिणाम व्यापक स्वरूपात जाणवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमागील मुख्य कारण म्हणजे पश्‍चिम आशियातील संघर्ष. या भागात वाढलेल्या अस्थिरतेमुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. चेंडू तयार करणार्‍या कंपनीकडून उपखंडात तयार माल उपलब्ध असला, तरी तो वेळेवर इंग्लंडमध्ये पोहोचवणे कठीण ठरत आहे. वाहतूक मार्गांवर वाढलेली गर्दी, सुरक्षा धोके आणि अनिश्‍चितता यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याशिवाय वाहतुकीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी तुलनेने कमी असलेला हवाई वाहतुकीचा खर्च आता तिपटीने वाढल्याने उत्पादन आणि वितरण यावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. परिणामी, उपलब्ध संसाधनांचे काटेकोर नियोजन करणे भाग पडत असून अनेक क्लबांना त्यांच्या गरजेच्या केवळ अर्ध्या प्रमाणातच चेंडू मिळत आहेत. ही परिस्थिती केवळ पुरवठ्यापुरती मर्यादित नसून खेळाडूंच्या सरावावर, स्पर्धांच्या गुणवत्तेवर आणि एकूण नियोजनावर परिणाम करू शकते. क्रिकेटसारख्या खेळात चेंडूची गुणवत्ता आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे या टंचाईमुळे खेळाच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS