Homeताज्या बातम्यादेश

बीसीसीआयच्या केंद्रीय करार पद्धतीत करणार बदल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या केंद्रीय करार प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलांतर्गत सध्या अस्तित्वा

आनंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : लाखाची बक्षिसे
आरती केदार हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
एमसीए निवडणूक वादाला न्यायालयीन ब्रेक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या केंद्रीय करार प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलांतर्गत सध्या अस्तित्वात असलेली ए+ श्रेणी रद्द करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून, तो मंजूर झाल्यास भारतीय क्रिकेटमधील काही दिग्गज खेळाडूंच्या करार श्रेणीमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात.
निवड समितीने खेळाडूंची फॉरमॅटनिहाय उपलब्धता, सातत्य आणि कामगिरी या निकषांच्या आधारे करार रचनेत बदल सुचवले आहेत. त्यानुसार, आता केवळ मर्यादित स्वरूपात खेळणार्‍या खेळाडूंना सर्वोच्च श्रेणीत ठेवावे का, यावर पुन्हा विचार केला जात आहे. या प्रस्तावावर बीसीसीआयच्या आगामी बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही दिग्गज खेळाडू भारतासाठी मुख्यतः एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतात. यामुळे त्यांच्या पुढील वार्षिक केंद्रीय करारातील स्थानाबाबत चर्चा सुरू झाली आहे. सध्या हे दोघेही ए+ श्रेणीत असून त्यांना वार्षिक 7 कोटी रुपयांचा करार मिळतो. मात्र, नवीन करार मॉडेलनुसार ए+ श्रेणीच रद्द झाल्यास, कोहली आणि रोहित यांना ग्रेड बी मध्ये स्थान दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीसीसीआय खेळाडूंच्या भूमिकांमध्ये झालेल्या बदलांचा आणि संघाच्या भविष्यातील गरजांचा विचार करून ही सुधारित प्रणाली लागू करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. जर बोर्डाने या नव्या करार रचनेला मंजुरी दिली, तर भारतीय क्रिकेटमधील केंद्रीय करार व्यवस्थेत हा एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल ठरेल, असे मानले जात आहे.

COMMENTS