मुंबई, दि. १८ : राज्यातील सहकार चळवळ भक्कम पायावर उभी रहावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम व्हावी यासाठी शासन कटीबद्ध असल्या

मुंबई, दि. १८ : राज्यातील सहकार चळवळ भक्कम पायावर उभी रहावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम व्हावी यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. २६० च्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.
प्रत्येक जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँका या ग्रामीण व कृषी वित्त पुरवठ्याचे आधारस्तंभ असल्याचे सांगून सहकार मंत्री पाटील म्हणाले की, अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी शासनाने ७६९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ‘लाडक्या बहिणीं’साठी सहकारी संस्था स्थापण्यास मान्यता दिली आहे. शासकीय ठेवी जिल्हा सहकारी बँकेत ठेवण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी वेगळी जिल्हा बँक स्थापण्यासाठी अहवाल मागवण्यात आला आहे. राज्यात नव्याने ५४ गोदामे बांधण्यात आली असून आणखी २५ गोदामे बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

COMMENTS