Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात गुंतवणुकीचे 1 लाख 37 हजार कोटींचे करार

दावोस/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून मोठ-मोठे प्रकल्प इतर राज्यांत जात असल्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत असल्याची

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग
महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात कपात

दावोस/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून मोठ-मोठे प्रकल्प इतर राज्यांत जात असल्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत असल्याची ओरड होत होती. मात्र दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी 1 लाख 37 हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्यामुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असून, हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे.

प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्‍वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत 54 हजार 276 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे 4300 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात 46 हजार 800 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून 45 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयटी क्षेत्रात 32 हजार 414 कोटींचे करार – माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये 32 हजार 414 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून 8700 जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 3000 जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये 1900 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे 600 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करणार्‍या उद्योजकांनी विश्‍वास दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण – राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी उद्योजकांसाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नविन धोरणामध्ये एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नविन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

COMMENTS