सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्या शिवाय डॉ आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- अँड.नितीन पोळ

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्या शिवाय डॉ आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- अँड.नितीन पोळ

कोपरगाव शहर प्रतिनिधी- देशातील शेवटच्या घटकाला योग्य संधी मिळाल्या शिवाय सामाजिक न्यायचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.

माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…
श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको
कोकणवासियांसाठी धावणार ’मोदी’ एक्सप्रेस l DAINIK LOKMNTHAN

कोपरगाव शहर प्रतिनिधी- देशातील शेवटच्या घटकाला योग्य संधी मिळाल्या शिवाय सामाजिक न्यायचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेलोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आहे या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात सर्व सामान्य माणूस केंद्रीभूत ठेऊन लढा उभारला असून सर्व सामान्य व्यक्तीला सामाजिक न्याय मिळावा म्हणून राज्य घटनेच्या मूलभूत हक्का मध्ये सामाजिक न्यायचे तत्व समाविष्ट केले आहे मात्र राज्य कर्त्याकडून आजही सामाजिक न्यायचे तत्व सत्ता, संपत्ती व अधिकाराचा वापर करून पायदळी तुडवले जात आहे हे भयाण चित्र कोविड महामारीत अनुभवास येत आहे त्यामुळे सर्वांनीच सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही यावेळी जयंती कोविड साथीच्या आजारात शासनाच्या नियमाप्रमाणे साजरी करण्यात आली तर कार्यक्रमास माजी नगर सेवक सोमनाथ म्हस्के, बाळासाहेब पवार, संजय तुपसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते

COMMENTS