महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम

संगमनेर / प्रतिनिधी दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका हे वैभव नामदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी व सर्वसमावेशक नेतृत्वामुळे झाले आहे. चांगल

Sangamner : हजरत ख्वाजा पिरमोहंमद सादीक यांचा उरूस साध्या पद्धतीने साजरा
सोमवार 11 ऑक्टोबर रोजी संगमनेर बंद
Sangamner : अखेर त्या मुजोर सहाय्यक पोलीस निरीक्षिकेची बदली

संगमनेर / प्रतिनिधी

दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका हे वैभव नामदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी व सर्वसमावेशक नेतृत्वामुळे झाले आहे. चांगले नेतृत्व असेल तर ग्रामीण विकासात किती प्रगती होऊ शकते याचे संगमनेर तालुका हा उत्तम उदाहरण असून संगमनेरचा सहकार पॅटर्न हा देशासाठी आदर्शवत ठरला असल्याचे गौरवोद्गार रायाचे सहकार रायमंत्री ना. डॉ.विश्‍वजीत कदम यांनी काढले असून पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे नामदार थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याच्या 11111 साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.

  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-2022 या गळीत हंगामातील पहिल्या 11111 पोत्यांचे पूजन रायाचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे , कृषी रायमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, खा.सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींच्या उपस्थित झाले.

याप्रसंगी बोलताना ना. डॉ. कदम म्हणाले की, ग्रामीण विकासामध्ये सहकाराचा अत्यंत मोठा वाटा राहिला आहे आणि यामध्ये संगमनेर तालुका हा रायात अग्रगण्य आहे. सक्षम नेतृत्वामुळे सहकारातून येथे प्रगती झाली आहे. विविध सहकारी संस्था ह्या प्रत्येक कुटुंबाशी जोडल्या असून यामुळे तालुक्यात प्रगती साधता आली आहे. सहकार हा आपल्या जिवाभावाचा असल्याने तो प्रत्येकाने जपला पाहिजे. थोरात कारखान्याने नवीन 5 हजार 500 मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन साखर कारखान्याची निर्मिती व 30 मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प हा तर सर्व कारखान्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. तर दूध संघाने पररायात जाऊन केलेली विक्री ही महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ग्रामीण भागांमध्ये खर्‍या अर्थाने सहकाराने समृद्धी निर्माण केली आहे. मागील पिढीने सहकाराचा पाया घातला. नामदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वाने त्यावर विकासाचा कळस चढवला आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकार आहे. तो जपला पाहिजे. ही चळवळ अधिक समृद्ध केली तर महाराष्ट्र खर्‍या अर्थाने समृद्ध होईल असा विश्वास व्यक्त करताना हा पॅटर्न सर्वत्र पोहचवण्यासाठी आपण काम करू असेही ते म्हणाले.

तर महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, काटकसर पारदर्शकता व सभासदांचा विश्वास ही कारखान्याने त्रिसुत्री कायम जपली आहे. उच्चांकी भाव देण्याची परंपरा जपताना पुढील पन्नास वर्षाच्या दूरदृष्टीचा निर्णय घेऊन 5 हजार 500 मे.टन क्षमतेचा कारखाना निर्माण केला हा एक पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.

 याप्रसंगी कारखान्याचे संचालक गणपतराव सांगळे, इंद्रजीत खेमनर, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे माणिक यादव ,भास्कराव आरोटे, दादासाहेब कुटे,  विनोद हासे , अनिल काळे , मीराताई वर्पे, मंदाताई वाघ आदी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले

COMMENTS