प्रवासासाठी आवश्यक क्यूआर कोड  पडताळणी राज्यानेच करावी : रावसाहेब दानवे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवासासाठी आवश्यक क्यूआर कोड पडताळणी राज्यानेच करावी : रावसाहेब दानवे

नवी दिल्ली / मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे सुरू करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र निर्णय घेण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायल

विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा
दारू वाहतूक करणारी वाहने लुटणारी टोळी पकडली
पोलिस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्‍यांवर गुन्हा

नवी दिल्ली / मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे सुरू करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र निर्णय घेण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे मत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केले आहे. हे क्यूआर कोड काढण्याची आणि तपासण्याची जबाबदारी कोणाची? अशी विचारणा करताना रेल्वेच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासले पाहिजेत. राज्य सरकारलाच ही तपासणी करावी लागणार आहे. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनेच तपासण्याची योजना करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करू देईल. प्रवासासाठीच्या अटींबाबत चर्चा करायला हवी होती! जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करू द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता. प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना त्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

९० टक्के फेऱ्या आताही सुरूच!
कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही ठराविक प्रवाशांसाठी १५ जूनपासून सेवा सुरू करण्यात आली होती. रेल्वेची भूमिका कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्याला कोरोना स्थिती नियंत्रणात आली असेल तर केंद्राला कळवा आम्ही त्वरित जनतेच्या सेवेत रेल्वे आणू असं सांगत होते. असंही सध्या ९० टक्के फेऱ्या सुरूच आहेत, असेही दानवे यावेळी म्हणाले.

COMMENTS