टाळेबंदीला काँग्रेसचा विरोध नाही : पृथ्वीराज चव्हाण

Homeमहाराष्ट्रसातारा

टाळेबंदीला काँग्रेसचा विरोध नाही : पृथ्वीराज चव्हाण

टाळेबंदी हा विषय राजकिय नाही त्याच राजकारण करून नये.

चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या आरोपीस चोवीस तासात अटक 
मुंबईत 15 कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त | DAINIK LOKMNTHAN
बनावट कागदत्रांद्वारे बँकेकडून 18 लाखांचे कर्ज

भाजप महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत यशस्वी होणार नाहीत

कराड / प्रतिनिधी : टाळेबंदी हा विषय राजकिय नाही त्याच राजकारण करून नये. एखाद्या उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा विषय घेतला पाहिजे. लोकांचे जीव वाचवण्याकरिता काही उपाय योजना केल्या पाहिजेत, हा विषय पॉलिटिकली नाही. परंतु टाळेबंदी केली पाहिजे, तर करावीच लागेल, असे  पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार यांच्या पोटात दुखायला लागले आहे, असा आरोप भाजप आयटी सेलचे प्रमुख नवीन कुमार यांनी केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना आ. चव्हाण म्हणाले, भाजपाचा महाराष्ट्रात सत्ता तर करायचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न चालू आहे. अजून चार वर्षे तो खेळ करायचा आहे. परंतू त्यात त्यांना यश येणार नाही. राज्य सरकारला काही होणार नाही, तीन पक्षाचे सरकार स्थिर सरकार आहे. आमच्याकडे संख्याबळ भरपूर आहे. आता कर्नाटक मॉडेल, मध्य प्रदेश मॉडेल, लोकांना पैसे देऊन फोडायचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. परंतू महाराष्ट्रात ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केले नसल्याचे या प्रश्‍नावर मला काही कल्पना नाही. मात्र, आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबरच आहेत इतरांकडून शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस नक्कीच झाली असेल अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

COMMENTS