भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारकरुंची तारांबळ उडाली. सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. परिसरातील काळकूप, माळकुप, जामगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ,भांडगाव सह अनेक गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून लांबलेल्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. या पावसामुळे भाळवणीच्या आठवडे बाजारात व्यापारी व बाजारकरू यांची मात्र मोठी तारांबळ उडाली.

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारकरुंची तारांबळ उडाली. सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. परिसरातील काळकूप, माळकुप, जामगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ,भांडगाव सह अनेक गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून लांबलेल्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. या पावसामुळे भाळवणीच्या आठवडे बाजारात व्यापारी व बाजारकरू यांची मात्र मोठी तारांबळ उडाली.

COMMENTS