अनिल अंबानी यांच्या मुलाचे टाळेबंदीवर ताशेरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल अंबानी यांच्या मुलाचे टाळेबंदीवर ताशेरे

उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील अंशतः टाळेबंदीवर ताशेरे ओढले आहेत.

पराभवाने खचायचे नाही, काम सुरूच ठेवायचे : अजित पवार
फेसबुकचं नाव बदललं..सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! (Video)
काँग्रेस सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांची निवड

मुंबई/प्रतिनिधीः उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील अंशतः टाळेबंदीवर ताशेरे ओढले आहेत. राजकीय नेते रॅलीचे आयोजन करत आहेत आणि चित्रपटांचे शूटिंगही सुरू आहे; पण उद्योगांवर कठोर निर्बंध लादले आहेत, असे खोचक ट्वीट अनमोल यांनी केले आहे. 

थेट अंबानी कुटुंबातून टाळेबंदीवर टीका झाल्याने याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंधांना सुरुवात झाल्यानंतर अनमोल अंबानी यांनी एक ट्वीट केले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमके काय? कलाकार शूटिंग करत आहेत. राजकीय नेते मोठ्या संख्येने रॅली काढत आहेत; पण तुमचा उद्योग आणि काम हे अत्यावश्यक नाही! प्रत्येक व्यक्तीला त्याचे काम अत्यावश्यक असते, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS