Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु ः डॉ.पाठक

उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचा समारोप

राहुरी /प्रतिनिधी ः आपल्या देशाची कृषि परंपरा ही अकरा हजार वर्षापूर्वीची आहे. आपला कृृषिचा पाया भक्कम असून त्याला नविन तंत्रज्ञान, कौशल्य आणि कृष

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे भोवले
कोपरगाव तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा हत्या करणारे तीन आरोपी जेरबंद
चोरट्यांची देवाच्या दारी चोरी | LOKNews24

राहुरी /प्रतिनिधी ः आपल्या देशाची कृषि परंपरा ही अकरा हजार वर्षापूर्वीची आहे. आपला कृृषिचा पाया भक्कम असून त्याला नविन तंत्रज्ञान, कौशल्य आणि कृषि उद्योजकतेची साथ मिळाली. तर कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु शकतो. असे महत्वपुर्ण वक्तव्य नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सचिव तथा महासंचालक डॉ. हिमांशू पाठक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील उपस्थित होते.यावेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि. विलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ.श्रीमंत रणपिसे,संचालक विस्तार शिक्षण डॉ.सी.एस.पाटील, भा.कृ.अ.प.च्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.के.के.पाल, सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार, डॉ.गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ.विठ्ठल शिर्के,नियंत्रक सदाशिव पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील म्हणाले की,या कृषि विद्यापीठाने अनेक उद्योजक घडविले आहेत. यामध्ये विलास शिंदे सारखे कृषि उद्योजक वीस हजारच्यावर शेतकर्यांपर्यंत पोहचले आहेत. यशस्वी कृषि उद्योजक बनायचे असेल तर शेतीवरील निष्ठा,कर्तव्य दक्षता व अद्ययावत तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.शेतकर्‍यांना शेतीतून समृध्द करायचे असेल. तर त्यांना शेतीमधील नविन विविधतेचे पर्याय देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ.पाटील यांनी केले. उद्योजक विलास शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जगातील तरुण वर्ग शेतीपासून दुर जात आहे.याचे कारण म्हणजे इतर क्षेत्रात सुरक्षीतता जास्त असून शेतीमध्ये सुरक्षीतता कमी आहे. यशस्वी कृषि उद्योजक तेव्हाच बनु शकतो जेव्हा आपत्तीला इष्टाआपत्ती समजून त्यातून मार्ग काढतो. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नाहेप अंतर्गत कास्ट-कासम प्रकल्पाच्या नविन कॉन्फरंन्स हॉलचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांनी कास्ट-कासम प्रकल्पाच्या प्रक्षेत्राला भेट देऊन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल लायसीमीटर उपकरणाची तसेच ड्रोनद्वारे औषध फवारणीची पाहणी केली. यावेळी मान्यवरांनी कास्ट-कासम प्रकल्पाच्या प्रयोगशाळेला भेट देवून कास्ट-कासम प्रकल्पाद्वारे विकसीत केलेले आय.ओ.टी. तंत्रज्ञान, रोबोटीक्स तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान जाणून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मानले.

COMMENTS