नवी मुंबई ः नवी मुंबईतील दोन शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी अभ्यासातील तणावामु

नवी मुंबई ः नवी मुंबईतील दोन शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी अभ्यासातील तणावामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मिसिंग प्रकरणानंतर एकाच दिवशी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वी ढवळे (वय 14 वर्ष) आणि दर्शील पाटील (वय 15 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. शाळेतील अभ्यास कठीण जात असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शील पाटील हा अल्पवयीन विद्यार्थी करावे परिसरात राहत होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने बहिणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवला. माझ्यावर अभ्यासाचा तणाव असून आपण कुटुंबियांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असा मॅसेज पाठवत त्याने तलावात उडी घेतली. दुसरीकडे नेरूळ येथे राहणार्या 14 वर्षाय पृथ्वी ढवळे याने देखील टोकाचे पाऊल उचलले. घरात कुणी नसल्याचे पाहून पृथ्वीने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अभ्यासाच्या तणावातून एकाच दिवशी दोन मुलांनी जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतून अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातच आता या घटना घडल्याने आजूबाजूच्या परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
COMMENTS