Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ननावरेंच्या आत्महत्याप्रकरणात दोन मंत्र्यांचा हात

संजय राऊत यांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः उल्हासनगर येथील रहिवासी नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोघांनाही आत्महत्

सत्तेवर बसलेल्या सरकारला लोकशाही पध्दतीने खाली खेचु – संजय राऊत  
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवला
सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?

मुंबई/प्रतिनिधी ः उल्हासनगर येथील रहिवासी नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोघांनाही आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची चर्चा सुरू असतांनाच, या प्रकरणामध्ये शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र राऊत यांचा अंगुलीनिर्देश नेमक्या कोणत्या मंत्र्यांकडे आहे, यासंदर्भात त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
न्याय मिळावा म्हणून नंदकुमार ननावरे यांच्या भावाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरीराचा रोज एक अवयव कापून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. आता या आत्महत्या प्रकरणात काँग्रेस आणि ठाकरे गटाने उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी तर या प्रकरणात शिंदे सरकारच्या दोन मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ननावरे आत्महत्या प्रकरणात शिंदे सरकारमधील दोन मंत्री सामील आहेत. एक मुंबईचा मंत्री आहे. तर दुसरा मंत्री सातारा फलटणचा आहे. त्यामुळे उद्वेगाने त्याच्या भावाने बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवले. या हाताने मी भाजपला मतदान केले. ते बोटच मी तोडले, असा ननावरे यांचा भाऊ म्हणाला. हे गंभीर आहे. तुम्हाला मन आहे की नाही? पंतप्रधान मन की बात करतात ती हवेतील आहे का? तरीही गृहमंत्र्यांना वेदना होत नसतील तर महाराष्ट्राचे दुर्देव आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. या खुनात दोन मंत्री आहेत. आमच्यावर लहानसहान गोष्टींवरून आरोप करणारे आता कुठे आहेत? ननावरे यांच्या कुटुंबाविषयी आमच्या मनात वेदना आहे. सहानुभूती आहे. मृत कुटुंबाचा भाऊ बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवतो. जर माणुसकी असती तर त्या भावाला समोर बसून गृहमंत्र्यांनी त्यांचे ऐकून घेतले असते, असेही ते म्हणाले.

COMMENTS