Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

बीड: धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळीकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि चिरडलं. या भीषण अपघातात रिक

तिरुवन्नामलाईमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू
अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .
खड्ड्यात चाक गेल्याने दोन वाहनात अपघात

बीड: धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळीकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि चिरडलं. या भीषण अपघातात रिक्षातील आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे. गंभीर जखमी रुग्णाला उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा भीषण अपघात बीड-परळी रोडवरील बकरवाडी फाट्यावर घडला.भीषण अपघातात तीन जण ठार अजीम शेख (रा. इस्लामपुरा राजू चौक) हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सकाळी धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रविवारी रात्री तिथून परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरने आपला ताबा सुटला, त्यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला (एमएच 20 एफएफ 0312) जोराची धडक बसली, यामध्ये नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाले. या धक्कदायक घटनेत रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS