Homeताज्या बातम्यादेश

त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे…

सचिन पायलट यांची मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर टीका

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानमध्ये काँगे्रसचे सरकार आल्यापासून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँगे्रस नेते सचिन पायलट यांच्यातील संघर्ष धारदार होता

कुंपणचं जेव्हा शेत खातं…
भाजपशासित राज्यात नेतृत्वबदलाचा अन्वयार्थ
1.89 मिटरने भूजल पातळीत वाढ

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानमध्ये काँगे्रसचे सरकार आल्यापासून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँगे्रस नेते सचिन पायलट यांच्यातील संघर्ष धारदार होतांना दिसून येत आहे. सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्यावर निशाणा साधतांना म्हटले आहे की, त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसंधुरा राजे आहेत.

पायलट म्हणाले की, मी पहिल्यांदाच पाहत आहे की, कोणीतरी आपल्याच पक्षाच्या खासदार आणि आमदारांवर टीका करत आहे. भाजप नेत्यांची स्तुती आणि काँग्रेस नेत्यांचा अपमान माझ्या समजण्यापलीकडचा आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरून असे दिसते की त्यांच्या नेत्या वसुंधरा राजे आहेत, सोनिया गांधी नाहीत. अनेकजण आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी खूप बोलतात, गप्पा मारतात. अशा गोष्टी मलाही बोलता येतात. पण मी स्टेजवर असे बोललो तर ते शोभत नाही. दरम्यान, काँग्रेसच्या सर्वोदयी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी माउंट अबूला पोहोचले आहेत. त्यातच सचिन पायलट यांनी पत्रकार परिषद घेत गेहलोतांवर आरोप केले. सचिन पायलट यांनी 11 एप्रिल रोजी जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर उपोषण केले आणि भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. पायलटच्या उपोषणापूर्वी, राज्य प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी एक लेखी निवेदन जारी करून हे पक्षविरोधी कृत्य म्हटले आहे. यानंतर वाद वाढल्यानंतर खासदार माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सचिन पायलटशी बोलून मध्यस्थी केली. पायलटच्या उपोषणाला पक्षविरोधी ठरवण्यात आलेला वाद शांत करण्यासाठी ते आले होते. आता पुन्हा त्यांच्यातील शब्दयुद्ध तीव्र होऊ लागले आहे. सचिन पायलट सातत्याने भाजपच्या राजवटीच्या भ्रष्टाचारावर कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. बाडमेरमध्ये मंत्री हेमाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित सभेत पायलट यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. पायलट म्हणाले होते की, भाजपच्या राजवटीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्याने अनेकांना राग आला, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. मी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत राहीन. दुसर्‍याच दिवशी धोलपूरच्या राजखेड्यात सीएम गेहलोत यांनी पायलट कॅम्पवर अमित शहांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला. आता या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. धौलपूर येथील राजखेडाजवळील महागाई निवारण शिबिराच्या सभेत गेहलोत यांनी जनतेला संबोधित करताना सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांची खिल्ली उडवली, त्यानंतर मंगळवारी पायलट यांनी गेहलोत यांच्यावर जोरदार टीका केली.

पायलट काढणार अजमेर-जयपूर मोर्चा –पायलट म्हणाले, ’आम्ही दिल्लीला जाऊन आमचे म्हणणे मांडले. वसुंधराजींच्या भ्रष्टाचारावर अनेक महिने पत्रे लिहिली. उपोषणाला बसलो. अजून तपास झाला नाही. कारवाई का झाली नाही हे मला समजले. आता मी हताश आहे. जनता हीच जनार्दन आहे. ती सर्व समजते. जनतेसमोर सर्वांना नतमस्तक व्हावे लागेल. भ्रष्टाचाराविरोधात 11 मे रोजी अजमेर ते जयपूर असा मोर्चा काढणार आहे. 125 किमी लांबीचा प्रवास असेल आणि त्यासाठी 5 दिवस लागतील.

COMMENTS