Homeताज्या बातम्यादेश

सुपरस्टार अभिनेत्याचा फिल्म इंडस्ट्रीला रामराम; राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय

मुंबई / प्रतिनिधी : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ’जाना नायकन’ जानेवारीमध्ये प्रद

राज्यातील जनतेला फसवण्याचा धंदा उद्धव ठाकरेंनी सुरू केला आहे काय…? (Video)
आ. जयंत पाटील जे नाव देतील तो उपनगराध्यक्ष : शहाजीबापू पाटील
पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण

मुंबई / प्रतिनिधी : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ’जाना नायकन’ जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी, 27 डिसेंबर रोजी मलेशियामध्ये ’जाना नायकन’चा ऑडिओ लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अभिनेता भावूक झाला आणि त्याने त्याचा शेवटचा चित्रपट वेदनादायक असल्याचे सांगितले.
विजय थलापतीने अभिनय सोडून राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी विजयने त्याचा ’तमिलागा वेट्टी कझगम’ हा राजकीय पक्ष सुरू केला. आता, अभिनेता आगामी तामिळनाडू राज्य निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, थलापती विजय त्याच्या शेवटच्या सिनेमाबद्दल बोलताना म्हणाला की, ’मला माहित नाही की, मी हे म्हणावे की नाही, पण माझा शेवटचा चित्रपट थोडा वेदनादायक आहे, मी काय करावे असे तुम्हाला वाटतेय?
राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय
थलापती विजयने राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याच्या निर्णयावरही चर्चा केली. अभिनेता म्हणाला, ’माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोक थिएटरमध्ये येतात आणि मला पाहण्यासाठी रांगेत उभे राहतात. म्हणूनच मी पुढील 30-33 वर्षे त्यांच्यासाठी रांगेत उभे राहण्यास तयार आहे. थलापती विजय पुढे म्हणाला, मला पहिल्या दिवसापासूनच सर्व प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण माझे चाहते सुरुवातीपासून माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. मी वाळूचा किल्ला बांधण्याच्या आशेनं चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता, पण तुम्ही मला एक राजवाडा दिला.

COMMENTS