मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला एवढं मारलं की विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला.

Homeताज्या बातम्यादेश

मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला एवढं मारलं की विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला.

५ मिनिटं शाळेत उशिरा यायला उशीर झाला म्हणून दिली शिक्षा

उत्तर प्रदेश प्रतिनिधी/ मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला जीवघेणी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढं मारलं की विद्यार्थ्याच्या पायाला

मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
ब्रम्हगावच्या शेतकऱ्याचा अपघात, प्रेत बार्शी पर्यंत नेहले फरफटत l पहा LokNews24
शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पन्नास हजारांचं अनुदान लाटण्याचा प्रकार समोर

उत्तर प्रदेश प्रतिनिधी/ मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला जीवघेणी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढं मारलं की विद्यार्थ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. या विद्यार्थ्याच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. पीडित विद्यार्थ्यानं मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी केली आहे . उत्तर प्रदेशातील शामली इथे आदर्श मंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेजमधील मुख्याध्यापकांनी ८ वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याची चूक एवढीच होती की तो ५ मिनिटं शाळेत उशिरा आला.. त्याने शिस्त मोडली म्हणून त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. एवढं मारलं की त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.

COMMENTS