Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रात आवर्तन सोडावे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष शेळके यांची मागणी

राहाता ः गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे तसेच शेती पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ रद्द करावी अश

कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील
शेत व शिवरस्ते प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा
राहुरीत गावकीच्या सहकाराचे धुराडे पेटले

राहाता ः गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे तसेच शेती पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ रद्द करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शेळके यांनी केली आहे.
उपअभियंता, गोदावरी उजवा तट कालवा, राहता यांना दिलेल्या निवेदनात विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या वतीने निवेदन देतो की, दारणा धरण समूहात जवळजवळ 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. कालवा लाभ क्षेत्रात यावर्षी जून महिन्यात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी खरीप पिके सोयाबीन, मका, कपाशी या पिकांची पेरणी केली आहे. शिवाय शेतात चारा पिके, फळबागा, ऊस इत्यादी पिके उभी आहेत. जवळजवळ एक महिन्यापासून पाउस उघडला असल्याने शेतातील उभी पिके जळू लागली आहे. तरी तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडून उभ्या पिकांना सात नंबर फॉर्मवर पाणी द्यावे तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत दहापट वाढ केली आहे. सन 2018-2019यासाठी बारामाही पिकांसाठी पाणीपट्टी दर स्थानिक करासह 538 रुपये होते नवीन दरवाढीप्रमाणे एकरी 5443 रुपये नवीन पाणीपट्टी दर असतील यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतमाल सोयाबीन, कांदा व इतर पिकाची निर्यात बंदी केल्यामुळे कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्यात पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत मोठी वाढ केल्याने पाटपाणी कसे घ्यावे? अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे. नवीन पाणीपट्टी दर खरीप पिकासाठी 1880 रुपये आणि रब्बीसाठी 3680 रुपये करण्यात आले आहे. या वाढीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणार आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी  हंगामात दुष्काळामुळे पिके जळून गेली आहे तरी यावर्षी खरीप व रब्बी हंगामात किमान दोन-दोन आवर्तने व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीची बैठक ही राहाता पाटबंधारे विभागात घेऊन लाभक्षेत्रातील शेतकरी यांना निमंत्रित करून नियोजन करण्यात यावे तसेच आता वाट  न पाहता शेतातील खरीप पिके, चारा पिके, ऊस, फळबागा यांना तातडीने आवर्तन सोडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकरी या प्रश्‍नावर तीव्र आंदोलन छेडतील याची नोंद घ्यावी असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे. पत्रकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, तालुकाध्यक्ष शंकरराव लहारे, राजेंद्र गोर्डे, भाऊसाहेब एलम, दादासाहेब गाढवे, हौशीराम चोळके, पुंजाराम आहेर, मीनानाथ पाचरणे, सावळेराम आहेर, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS