Homeताज्या बातम्यादेश

लग्न मंडपातून निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात  वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी तयार झालेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी म

जिल्हा परिषद शाळा मेसनखेडे बु॥ येथे वृक्षारोपन  
खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत – मुख्यमंत्री
शेतकर्‍यांचे वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार : सरकारचे नवे फर्मान

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात  वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी तयार झालेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या नवरदेवाची प्रकृती अचानक बिघडल्याने गोंधळ झाला. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबामध्ये शोककळा पसरली. लग्नासाठी टाकलेल्या मंडपात नवरदेवाचा मृतदेह आला.  लग्नघरात दु:खाचे वातावरण पसरले, वऱ्हाडातून लग्नाला निघालेले लोक नवरदेवाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जरवल रोडच्या अटवा गावातील आहे. याठिकाणी रामलालचा मुलगा राजकमल याचे वऱ्हाड अटैसा गावात जाणार होते. घरी लग्नाचा माहौल होता. लग्नाची सर्वच तयारी पूर्ण झाली होती. नवरदेव राजकमलचे वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होते. राजकमल तयार झाला होता. बाशिंग बांधले होते तितक्याच नवऱ्या मुलाची तब्येत अचानक बिघडली.  नवऱ्याची प्रकृती ढासळल्याने त्याला तातडीने घरच्यांनी मुस्तफाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, राजकमलचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. ही दु:खद वार्ता ऐकून कुटुंबाने टाहो फोडला. लग्नघरात शांतता पसरली. सनई वाजायची थांबली. घटनेची माहिती मिळताच नवरीकडील मंडळीही राजकमलच्या घरी पोहचले. काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळेच आनंदात होते त्या आनंदावर राजकमलच्या मृत्यूने विरजण पडले.  जिथून वऱ्हाड निघणार होते तिथून अंत्ययात्रा निघाली

COMMENTS