Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या

नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता
प्रा. कुंदा दाभोळकर स्मृति केंद्रातर्फे लक्ष्मीबाई पाटील वस्तीगृहाला सहयोग निधी आज प्रदान कार्यक्रम
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी 22 वी ऊस परिषद पार पडल्यानंतर बुधवारी आंदोलन सुरू झाले आहे. येत्या 3 दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा. अन्यथा दिवाळीनंतर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवले आहेत. कारदगा परिसरात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं.

COMMENTS