सूरत-हैदराबाद महामार्गबाधितांनाजास्तीत जास्त मोबदला मिळावा : मंत्री थोरात करणार पाठपुरावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूरत-हैदराबाद महामार्गबाधितांनाजास्तीत जास्त मोबदला मिळावा : मंत्री थोरात करणार पाठपुरावा

संगमनेर/प्रतिनिधी : भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दळणवळणासाठी चौपदरी रस्ते हे अत्यंत गरजेचे आहे. सूरत-हैदराबाद रस्त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला आणखी चा

मढीत मानाची होळी पेटवत कानिफनाथ यात्रेला सुरूवात
आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव वाघातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा

संगमनेर/प्रतिनिधी : भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दळणवळणासाठी चौपदरी रस्ते हे अत्यंत गरजेचे आहे. सूरत-हैदराबाद रस्त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला आणखी चालना मिळण्यास नक्की मदत होणार आहे. याचबरोबर या रस्त्यासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहे, त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे केले.
संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयात सूरत-हैदराबाद रस्त्याबाबतची बैठक ना. थोरातांनी घेतली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहुरीचे प्रांताधिकारी दयानंद जगताप, महामार्गाचे मिलिंदकुमार वावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. आर. पाटील, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रस्त्यांचे चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. सूरत-हैदराबाद या महामार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याचे वैभव वाढणार असून या कामी ना. नितीन गडकरी यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या सुमारे शंभर किलोमीटर लांबीच्या या चौपदरीकरण रस्त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात आणखी भर पडणार आहे. हा रस्ता अद्ययावत व वैभवशाली होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या रस्त्यामध्ये ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्या सर्व प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकार हे कायम विकासाच्या पाठीमागे राहिले असून सर्वसामान्य माणसाला जास्तीतजास्त चांगल्या सुविधा निर्माण करून देत त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले की, सूरत-हैदराबाद रस्त्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साईड रस्ते, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी शेतकर्‍यांच्या पाईपलाईन आहेत, इतर बायपास रस्तेही आवश्यकतेनुसार झाले पाहिजे, याबाबत दर आठवड्याला बैठक घेऊन चर्चेतून प्रश्‍नांची सोडवणूक हवी, असेही ते म्हणाले. यावेळी संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी व अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्‍या विविध गावे व शेतकर्‍यांच्या समस्या थोरात व तनपुरे यांनी जाणून घेतल्या. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

COMMENTS