Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीमध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

चंद्रपूर ः राज्यभरात बारावीचा निकाल झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे एका विद्यार्थ्याने बारावीत अपयश आल्याने जीवनयात्रा

जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

चंद्रपूर ः राज्यभरात बारावीचा निकाल झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे एका विद्यार्थ्याने बारावीत अपयश आल्याने जीवनयात्रा संपवली. आकाश पुरुषोत्तम वैरागडे (वय 18, रा. नेरी, चिमूर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करिन असा त्याचा आत्मविश्‍वास होता. मात्र नापास झाल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

COMMENTS