Homeताज्या बातम्यासंपादकीय

निधी वळवल्याचा अपप्रचार थांबवा !

अर्थसंकल्पात एससी आणि एसटी प्रवर्गासाठी विविध योजनांची तरतूद केली जाते. त्यासाठी विशिष्ट रकमेचा निधी दिला जातो. परंतु, असा निधी इतर योजनांमध्ये व

आनंदराज आंबेडकरांची अमरावतीतून माघार
त्यांचे पुनर्वसन झाले नाही, पण 47 लाखाची माफी मिळणार?
पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रकरणात आरोपीला 21 वर्षांनी अटक

अर्थसंकल्पात एससी आणि एसटी प्रवर्गासाठी विविध योजनांची तरतूद केली जाते. त्यासाठी विशिष्ट रकमेचा निधी दिला जातो. परंतु, असा निधी इतर योजनांमध्ये वळविण्याचा प्रकार महाराष्ट्रात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात राबविली गेली.‌ दिवंगत आर. आर. आबा तर याच्यात अधिक माहिर होते. ती परंपरा अजितदादा पवार यांनी संयुक्त सरकारांच्या काळात अधिक आक्रमकपणे राबविली होती. परंतु, हे पक्ष जेव्हा विरोधी पक्षात येताच त्यांनी सध्या एससी, एसटी च्या निधीला वळविण्यात आल्याचा प्रचार सातत्याने चालविला आहे, ज्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. या विभागांचं बजेट पावणे दोन पटींनी वाढलं आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी लाडकी बहिण योजनेचा निधी वळवल्याच्या आरोपावर प्रत्त्युत्तर व स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेले आहे, ते पुस्तक मी त्यांना देईन, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्यांना लगावला.  रिझर्व बँकेने देशातल्या प्रत्येक राज्यात आलेल्या परकीय गुंतवणुकीचे आकडे जाहीर केले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या नंबरवर आलेला आहे. नुसत्या पहिल्या नंबरवर नाही तर देशामध्ये जेवढी गुंतवणूक आलेली आहे त्या सगळ्या गुंतवणुकी पैकी चाळीस टक्के गुंतवणुक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. इतर सगळे राज्य उर्वरित साठ टक्क्यांमध्ये आहेत. एकटा महाराष्ट्रात ४० टक्के गुंतवणूक आली आहे. सरकारवर जगातल्या गुंतवणूकदारांनी पहिली पसंदी दिली आहे आणि आता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मागे राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही बाब महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि एकूणच अर्थसंकल्पाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे विरोधी पक्षांनी एसी आणि एसटी प्रवर्गाचा निधी वळवल्याचा अपप्रचार आता थांबवायला हवा. कारण, हेच पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा, त्यांनी या व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम केलेले नाही. याउलट त्यांनी तर एससीएसटी प्रवर्गाचा निधी जो वळवला त्याचा विनियोग करताना स्वतःच्या तुंबड्याच  भरल्या आणि त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावर सक्तीचा काळ आला आहे असे वाटते,  ती त्यांच्या अशा धोरणामुळेच झालेल्या आहेत. एवढे खरे,  एकंदरीत आता विरोधी पक्षाने देखील हा अपप्रचार थांबवून सत्तेला मदत करून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भरणी नव्हे तर कळस चढवला पाहिजे. हीच आता सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कुशल पणे महाराष्ट्राच नेतृत्व केलेले आहे.

COMMENTS