शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना ईडीचा दणका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना ईडीचा दणका

जालना सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जमीन जप्त

जालना/प्रतिनिधी : राज्यात एकीकडे सत्तांतराच्या चर्चा सुरु असतांनाच, दुसरीकडे शिवसेनेला अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दुसरा दणका दिला आहे. शिवसेने

साई समृद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव
सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यूू
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात वाचनालय गरजेचे ः स्नेहलता कोल्हे

जालना/प्रतिनिधी : राज्यात एकीकडे सत्तांतराच्या चर्चा सुरु असतांनाच, दुसरीकडे शिवसेनेला अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दुसरा दणका दिला आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची जालन्यातील साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे.
कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ईडीने जप्त केली. काही महिन्यांपूर्वी देखील ईडीने या कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती. दरम्यान, आता अचानक झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच खळबल माजली असून खोतकर सध्याला मुंबईला आहेत. या कारवाई बाबत आम्हाला काही माहीत नाही, संस्थेला अधिकार आहेत कारवाईचे त्यांनी कारवाई केली. आम्ही यासंदर्भात न्यायालयात दाद मागू, असे खोतकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, या कारवाईमुळे खोतकर-दानवे वाद पुन्हा चिघळणार असून ईडीचा धाक दाखवून थेट भाजप अथवा बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडे खेचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून खोतकर यांनी मात्र आपण घाबरणार नाही, असे म्हणत यान चर्चेला तूर्तास विराम लावण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचं एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झालं होतं. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकार्‍यांनी खोतकरांची सलग 12 तास चौकशी केली. पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकार्‍यांचं समाधान झालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली होती. खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोतकरांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

COMMENTS