Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांचे निधन

पुणे/प्रतिनिधी ः रानकवी, निसर्गकवी म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ कवी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ते 81 वर्षांचे ह

भररस्त्यात अचानक पेटली कार अन्….
राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
वडिलांना सोडून परतताना तरुणाच्या टिप्परखाली चिंधड्या | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः रानकवी, निसर्गकवी म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ कवी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.
ना. धों. महानोर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्‍वात ते ’रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीते आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध करणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत. नामदेव धोंडो महानोर असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ’पानझड’, ’तिची कहाणी’ ’पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना होय.

COMMENTS