Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी स्वयंचलीत तंत्रज्ञानाचा वापर करवा- कुलगुरू पाटील

हवामान बदलाचा परिणाम कृषि क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या बदलत्या हवामानात शाश्वत उत्पादनासाठी शेतकर्यांनी शास्त्रीयदृष्ट्या शेती करणे गरजेचे

Sangamner : गणपती काळात मिरवणुकीवर बंदी
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे 

हवामान बदलाचा परिणाम कृषि क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या बदलत्या हवामानात शाश्वत उत्पादनासाठी शेतकर्यांनी शास्त्रीयदृष्ट्या शेती करणे गरजेचे आहे. यामध्ये एकात्मिक शेती, काटेकोर शेती, शेतीमध्ये स्वंयचलीत तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या स्वयंचलीत तंत्रज्ञान प्रणालीचा विकास महात्मा फुले कृषि विद्यापीठाद्वारे केला जात आहे. कृषि विद्यापीठातील भा.कृ.अ.प., नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पातील कार्यरत असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन (कास्ट कासम) प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थान करिता बाबुर्डी घुमट व बुचकेवाडी या गावांमध्ये हवामान अद्ययावत तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य सुरु असून, हवामान अद्ययावत गाव तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकर्यांना हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन या विषयी जागरुकता निर्माण व्हावी व तंत्रज्ञानांचा अवलंब झपाट्याने व्हावा याकरिता विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत आहेत. नैसर्गिक संसाधनांचे जतन, पिकांचे अचूक व्यवस्थापन, उत्पादनखर्चात बचत करून उत्पादनात वाढीसह कृषिचा शाश्वत विकास करून शेतकर्यांना स्वावलंबी बनविण्यात स्वयंचलीत तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावेल असे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.
जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थान, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व भारतीय कृषि इंजिनिअर संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्तपणे आयोजित 3.9 कृषिमधील स्वयंचलन या विषयी वेबिनारचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचा विषय संशोधन व शिक्षणातील भावी दृष्टीकोन हा होता. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. या ऑनलाईन वेबिनार प्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि इंजिनियर संस्थेचे प्रमुख डॉ. गजेंद्र सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोल्याचे माजी कुलगुरू डॉ. व्ही.एम. मायंदे, मुंबई येथील सिफाचे संचालक डॉ. सय्यद इस्माईल, कास्ट प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, सहप्रकल्प समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, सदस्य डॉ. सचिन नलावडे, अहमदनगर जिल्यातील पारनेर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री.राहुल रसाळ, जळगाव येथील प्रगतशील शेतकरी डॉ. रविंद्र निकम, दौंड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री. संदीप घोले आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. गजेंद्र सिंग म्हणाले शास्त्रीयदृष्ट्या शेती केली तर शेती फायदेशीर ठरते. शेतकर्यांनी शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व शेतकर्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये नवनविन प्रयोग करावे आणि शेतीकडे उद्योग म्हणुन बघावे. या वेळी प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी जल व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले व हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत विकसीत करण्यात आलेले विविध तंत्रज्ञान या विषयी विस्तृत माहिती दिली. सह-प्रकल्प समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी कास्ट-कासम प्रकल्पांतर्गत हवामान स्मार्ट गावे या संदर्भात माहिती दिली. डॉ. सचिन नलावडे यांनी कास्ट-कासम प्रकल्पाद्वारे संशोधीत शेती करिता ड्रोन व यंत्रमानव वापर विषयी माहिती दिली. प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ, डॉ. रविंद्र निकम आणि श्री. संदीप घोले यांनी हवामान अद्ययावत शेती, शेतीमधील स्वयंचलीत तंत्रज्ञान आणि एकात्मिक शेती पध्दती विषयी आपले अनुभव सांगितले. या वेबिनारचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सय्यद इस्माईल यांनी मानले.

COMMENTS