https://www.youtube.com/watch?v=CjWLQzDboJA संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्
संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेचे गांभीर्य आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, संगमनेरमधील ज्या चिमुरडीवर हल्ला झाला ती गंभीर आहे. इतकी मोठी घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा? आरोपींना पळून जाण्याची हिंमत मिळतेच कशी?असा सवाल त्यांनी केला

COMMENTS