Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायकवाडीत केवळ 9.80 टक्केच पाणीसाठा

पैठण ः जायकवाडी धरणाच्यापाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. हा पाणीसाठा आता 9.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर 24 तासांपूर्वीच साठा 10.30 टक्के होता.

महिला सरपंचासोबत थाटामाटात प्रेमविवाह,मग उपसरपंचावर जीवघेणा हल्ला | LOKNews24
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ ः पंतप्रधान मोदी
मुळाच्या पाणी वापर संस्थांच्या निवडणुका होणार लवकरच

पैठण ः जायकवाडी धरणाच्यापाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. हा पाणीसाठा आता 9.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर 24 तासांपूर्वीच साठा 10.30 टक्के होता. याचाच अर्थ तीव्र तापमानवाढीमुळे पाणीसाठा प्रचंड प्रमाणात घट होतांना दिसून येत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह पैठणला पाणीपुरवठा करणार्‍या पंपहाऊसला आपत्कालीन पंपानेपाणीपुरवठा करावा लागणार आहे.दरम्यान, मागील वर्षी याच दिवशी 50.78 टक्के पाणीसाठा होता. जायकवाडी धरणात गतवर्षीच्यापावसाळ्यात केवळ 47 टक्केपाणीसाठा झाला होता. तसेच समन्यायी पद्धतीने सहा टक्के पाणीसाठा आला. त्यातून परळीला पाणी द्यावे लागले.

COMMENTS