भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाटयाजवळील घटना

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील मंगळवारी सकाळी 6 वाजता भीषण अपघात झाला असून, ज्यात आई आणि मु

मुंबई-पुणे ’एक्स्प्रेस-वे’वरील अपघातात 5 जणांचा मृत्यू
स्वप्न अपूर्ण राहिलं..! लहान बहिणीला वनरक्षक भरतीसाठी घेऊन जाणाऱ्या सख्या बहीण भावांना ट्रक ने चिरडले
Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील मंगळवारी सकाळी 6 वाजता भीषण अपघात झाला असून, ज्यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात झाला असून, ज्यात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कलीयाबाई गोविंद गिरे आणि आर्जुन गोविंद गिरे असे मृत आई-मुलाचं नाव आहे. तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हे सर्व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मानिकपुंद येथील रहिवासी आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याच्याजवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसने (क्रमांक एमएच 14 बीटी 2500) ऊस तोडीला जाणार्‍या बैलगाडीला जोराची धडक दिली. बसचा वेग अधिक असल्याने बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर या अपघातात बैलगाडीत बसलेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बैलगाडी चालवत असलेले मृत महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव करत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यात सकाळी औरंगाबाद,अहमदनगर ते पुणे असे प्रवास करणार्‍या लोकांची संख्या अधिक असते. त्यामुळे सकाळी बस आणि बैलगाडीचा अपघात झाल्यावर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या गाड्यांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत आई-मुलाचा मृतदेह रुग्णालयात पाठवत, जखमीला उपचारासाठी रुग्णवाहिकेने पाठवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे काही वेळात रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत सुरु झाला आहे.

COMMENTS