Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरू

सगेसोयरेची अधिसूचना जारी करण्याची मागणी

जालना ः मनोज जरांगे यांनी शनिवारपासून मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र केला आहे. सगेसोयरेची अधिसूचना जारी करण्याची प्रमुख मागणी करत त्यांनी

मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार

जालना ः मनोज जरांगे यांनी शनिवारपासून मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र केला आहे. सगेसोयरेची अधिसूचना जारी करण्याची प्रमुख मागणी करत त्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. मात्र पोलिसांकडून या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. मी उपोषण करणारच असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच माध्यमांशी बोलतांना त्यांनी सगेसोयरेची अधिसूचना करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. यावेळी माध्यमांसोबत बोलतांना जरांगे म्हणाले की, यावेळी आता मराठा आरक्षण दिले नाही तर विधानसभेत मी स्वतः नाव घेऊन उमेदवार पाडणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. शिवाय मराठा आरक्षण न दिल्यास 288 जागांवर उमेदवार उभे करणार. यामध्ये सर्व जाती धर्माच्या उमेदवारांचा समावेश असेल. मग यासाठी जबाबदार सरकार असेल. त्यानंतर सरकारला बोलायला जागा राहणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे, ते म्हणाले, मराठा समाजाने शांत राहायचे आहे. सरकारकडून सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे. जातीय तेढ या शब्दांत आता द्वेष दिसायला लागला आहे. ग्रामस्थांकडून देण्यात आलेले निवेदन हे जाणीवपूर्वक होते. मात्र मला राजकारणात पडायचे नाही. मी आचारसंहितेचा सन्मान केला म्हणून 4 जूनच्या उपोषण 8 जूनपर्यंत पुढे ढकलले. आता विनाकारण समाजाला वेठीस करण्याचे कारण नाही, असे जरांगे म्हणाले. तसेच उपोषण करण्याची वेळ का आली या प्रश्‍नावर जरांगे म्हणाले, सरकारने सगेसोयरेचे अध्यादेश काढले मात्र त्या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करावी यासाठी माझ्यावर पुन्हा उपोषणाची वेळ आली आहे. शिवाय सरकारने मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र उलट आणखी लाखो मराठ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आश्‍वासने सरकारने दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे. मग हाच मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, असे जरांगे म्हणाले. सरकारचे षडयंत्र सुरू आहे. सरकारलाच हे गोरगरिबांचे आंदोलन मोडीत काढायचे असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

COMMENTS