Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराणी ताराराणी समाधीकडे दुर्लक्ष होणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

सातारा / प्रतिनिधी : मुगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधीस्थळाकडे शासनाचे

थकबाकीपोटी महावितरणच्या सबस्टेशनला मसूर ग्रामपंचायतीने सिल ठोकताच पाणी पुरवठा सुरळीत
लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन
जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा / प्रतिनिधी : मुगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधीस्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष होणार नाही. समाधी जीर्णोध्दाराबाबत शासन सकारात्मक असून, हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मराठा साम्राज्यातील महापराक्रमी, मुघल मर्दिनी करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा धगधगता इतिहास आजही वीरश्री निर्माण करणारा आहे. मात्र, अशा महापराक्रमी महाराणीचे सातार्‍यातील संगम माहुली येथील समाधीस्थळ अनेक वर्षांपासून उपेक्षितच आहे. याबाबत अनेकदा इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त करून समाधीस्थळाचा जीर्णोध्दार करण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर एकनाथ शिदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सातार्‍यात महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोध्दार करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. स्वराज्य विस्तारात महाराणी ताराराणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या समाधीच्या बाबतीत कुठेही दुर्लक्ष होणार नाही. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास आहे. त्यासाठीच राज्य सरकार गडकोटांचे जतन व संवर्धन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांपैकी 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला असून हे आपले मोठे यश आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाबाबत सरकार कुठेही कमी कमी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

COMMENTS