Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतवाली पोलिसांनी तीन लाखांचे मोबाईल तक्रारदारांना केले परत. 

विशेष मोहीमेंतर्गत चोरीचे मोबाईल हस्तगत

अहमदनगर/प्रतिनिधी. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तांत्रिक बाबींचा तपास करून चोरी गेलेले व गहाळ झालेले १९ मोबाईल हस्तगत केले. दोन लाख ९३ हज

पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा ः आदिनाथ देवढे
पदाच्या माध्यमातून युवकांना पाठबळ देण्याचे काम -विक्रम राठोड
योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक- नंदकुमार गव्हाणे

अहमदनगर/प्रतिनिधी. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तांत्रिक बाबींचा तपास करून चोरी गेलेले व गहाळ झालेले १९ मोबाईल हस्तगत केले. दोन लाख ९३ हजार ३०० रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलिस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत. गेल्या दोन महिन्यात साडेचार लाख रुपये किमतीचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आले असून, कोतवाली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

  मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवाली चे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला दिले होते. कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले १९ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तक्रारदारांना कोतवाली चे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलिस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.      ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस नाईक सलीम शेख,  राजेंद्र फसले व दक्षिण मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

मोबाईल यांना मिळाले परत – दिलीप रंगनाथ गोरे (रा.आगरकर मळा), दत्तात्रय मधुकर बेट्टी (रा.सर्जेपुरा), लहानू मारुती उमाप (रा.केडगाव), धीरज छोटेलाल लड्डा (रा.आडते बाजार), शेख सादिक अलाउद्दीन (रा.खाटीक गल्ली), ऋतिक राजेंद्र वाघ (रा.हातमपुरा), समीर फाटक (रा.शनि चौक अ.नगर), भीमा सकट (रा.रेल्वेस्टेशन, अ.नगर), शंकर गावडे, तुषार खराडे (रा.राळेगण म्हसोबा, अ.नगर), रिजवान खान (रा. अ.नगर), राजेश शिरसाट (रा.अ.नगर), करनाराम भांड (रा.जोधपूर, राजस्थान), सागर जाधव (रा.अ.नगर), जय शिंदे (रा. नाशिक), मेहुल सोनी (रा.अहमदाबाद, गुजरात), राजू आहेर, (अ.नगर), प्रताप थोरात (रा.अ.नगर), 

वैशाली कांडेकर (रा. हिंगणगाव, अ.नगर),  यांना मोबाईल फोन परत देण्यात आले.

COMMENTS