औरंगाबाद प्रतिनिधी - एका बाजूला देशातील व राज्यातील सामान्य कष्टकरी जनता महागाई - बेरोजगारी - भ्रष्टाचाराने त्रस्त असताना, ज्यांचे वैचारिक शिदोरी
औरंगाबाद प्रतिनिधी – एका बाजूला देशातील व राज्यातील सामान्य कष्टकरी जनता महागाई – बेरोजगारी – भ्रष्टाचाराने त्रस्त असताना, ज्यांचे वैचारिक शिदोरी मुळे या बहुजन, दलित – आदिवासी, भटके – विमुक्त, महिला व असंघटित कष्टकर्याना, शिक्षण, आत्मसन्मान, सामाजिक न्याय व सुरक्षेची व्दारे खुली झाली , त्याच महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी मूठभर सत्ताधारी मंडळी करीत आहेत यात शंकाच नाही जाति – धर्माचे नावाने गोरगरीबात सतत संशयाचे वातावरण निर्माण करून, त्यांच्यात फूट पाडण्याचे मोठे षडयंत्र उभे केले जात आहे. या सर्व कष्टकऱ्यांच्या जगण्याचा आधार असलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योति सावित्री बाई फुले, लोकराजा शाहू महाराज, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पद्मभूषण विठ्ठल रामजी शिंदे इ ……महापुरूषांची बदनामी कदापी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा साथी सुभाष लोमटे यांनी दिला आहे.
COMMENTS