Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सृष्टी, संस्कृती, सिद्धी, रिद्धी व संस्कार यांचा गौरव

अकोले प्रतिनिधी - तालुक्यातील सुगाव खुर्द येथील जिल्हा परिषदेतील शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या सृष्टी, संस्कृती,सिद्धी , रिद्धी व संस्कार य

जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया चक्क मध्यरात्रीपर्यंत होती सुरू
शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्‍नांची सकारात्मक पध्दतीने सोडवणुक होण्याची अपेक्षा -बाबासाहेब बोडखे
तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा भरला चौथीचा वर्ग

अकोले प्रतिनिधी – तालुक्यातील सुगाव खुर्द येथील जिल्हा परिषदेतील शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या सृष्टी, संस्कृती,सिद्धी , रिद्धी व संस्कार यांचा  सत्कार अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्‍वस्त हभप दीपक महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याचे नियोजन  शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व ज्ञानेश्‍वर दूध संघ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच विष्णुपंत वैद्य हे होते.


यावेळी सुगाव खुर्दचे भूमिपुत्र प्रा.अमोल वैद्य यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या उत्तर नगर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यशस्वी उद्योजक भारत पिंगळे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन वैद्य, मार्गदर्शक डॉ.साहेबराव वैद्य, उपसरपंच डॉ.धनंजय वैद्य, दूध संस्थेचे संचालक शांताराम वैद्य, अनिल पवार, सोसायटीचे अध्यक्ष बी.डी.वैद्य, लक्ष्मण वैद्य, मुख्याध्यापक उल्हास एखंडे, नितीन नेहे, वनिता चौधरी, दिपाली क्षीरसागर, विलास ढोले व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.दीपक महाराज देशमुख म्हणाले की,विद्यार्थ्यांनी यश अपयशाची काळजी न करता सर्व परीक्षा दिल्या पाहिजेत. आपल्यापैकी आपल्या मित्रांचा सत्कार होतो याचा आदर्श घेऊन आपल्या पालकांना समाधान व शिक्षकांना अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास करावा.इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही गृहपाठ दिला जातो. मात्र ग्रामीण भागातील पालकांना आपल्या पाल्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढलीआहे.मातृभाषेतील शिक्षणाने अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेलेले आहेत.जि.प.प्रा.शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून त्या टिकवण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे.राज्यातील आदर्श शाळेना भेट देण्याचा मनोदय चांगला असून त्याचा फायदा निश्‍चितच विद्यार्थ्यांना होईल असा विश्‍वास देशमुख यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विष्णुपंत वैद्य यांनी ही शाळा चावडीत भरत होती .आज ती सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतःच्या इमारतीत भरत आहे, सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत आहे.याचा आनंद वाटतो.उज्वल भवितव्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे असून या शाळेतून चांगले विद्यार्थी घडले आहेत,तीच परंपरा पुढे चालू ठेवावी असे मत व्यक्त केले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन वैद्य व तज्ञ सदस्य डॉ. साहेबराव वैद्य यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगत राज्यातील आदर्श शाळांना शिक्षक,व्यवस्थापन समिती व इच्छुक पालकासमवेत भेटी देणार आहोत असे सांगितले. यावेळी पत्रकार अमोल वैद्य यांनी गावच्या शैक्षणिक विकासाचा आलेख हा सतत उंचावत जावो अशी अपेक्षा व्यक्त केली.व आपल्या सत्काराबद्दल उपस्थितांची कृतज्ञता व्यक्त केली.  सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण वैद्य यांनी  केले तर आभार मुख्याध्यापक उल्हास एखंडे यांनी मानले.

COMMENTS