Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ

सोयाबीनसह कापसाचेही नुकसान

नागपूर : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कापसाच्या प

पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णवाहिकेत अडकला मृतदेह.
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

नागपूर : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यालाही अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना बसला आहे. मुसळधार पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाचे पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यास चित्र आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने विदर्भ, मराठवाड्यातील शेतीचे आणि पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केलं आहे. औसा तालुक्यातील अनेक गावात शेत शिवारात पाणीच पाणी शिरल्याचे चित्र असून अनेक पिके पाण्यात बुडाली आहेत. दरम्यान, 30 तासानंतर शेतात जायला रस्ता मिळाला असल्याचेही बघायला मिळाले आहे. औसा तालुक्यात झालेल्या तुफान पावसामुळे अनेक शेती शिवारात पाणीच पाणी झाले आहे. औसा तालुक्यातील उजनी, एकंबी, मासूर्डी, टाका, तुंगी, बिरवली, भादा, जवगाव यासह अनेक गावातील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेलंय. सुमारे दोन तासात तुफान झालेल्या पावसाने सर्व चित्र बदलून टाकले आहे. दरम्यान, या भागातील नदी, नाले ओढे आणि शहरातील रस्तेही पाण्याने भरून वाहत होते. परिणामी अनेक भगत पावसाचे पाणी शेतात शिरले आहे. तर अनेक गावाच्या शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारी पाऊस झालेला असताना शेतात रविवारी संध्याकाळी पोहोचण्याला रस्ता मिळाला आहे. एकंदरीत सर्वत्र पाणीच पाणी असल्याने शेत शिवारात पोहोचणे ही मुश्किल झाले होते. दुसरीकडे विदर्भातील वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून बरसात असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. परिणामी, खरीप हंगामातील काढणीला आलेले सोयाबीन पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यास चित्र आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी केलेले सोयाबीन आता काढणीला सुरुवात झालेली आहे. मात्र, परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला असून  शेतात सोंगणी केलेले आणि काढणीला आलेले सोयाबीन पिकाचे चिखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोयाबीनला फुटताय कोंब – काढणीला आलेला सोयाबीन काढून ठेवला असताना हा सोयाबीन पावसात भिजून गेला आहे. गेल्या दोन दिवस सातत्याने पाण्यात राहिल्याने सोयाबीनला आता कोंब फुटतांना दिसून येत आहे. उजनी परिसरातील शेतकर्‍यांचीही अशीच काहीसे परिस्थिति आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने वेळीच पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS